समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १ 

एके दिवशी क्लिनिक मध्ये तन्वी नावाची (नाव बदललेले आहे) पेशंट आली होती. काय त्रास होतो? असे विचारल्यानंतर ढसाढसा रडायला लागली. पाणी प्यायला देऊन थोडी सांत्वना केली पण रडणे थांबत नव्हते. शेवटी सोबत आलेल्या तिच्या ‘श्री’ ने (पतीने) सांगण्यास सुरुवात केली, अहो डॉक्टर, घरात – ऑफिसमध्ये – बस स्टॉपच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये – ट्रेनमध्ये – सगळीकडे ‘ तुमच्या लग्नाला ३-४ वर्ष झाले, याला झाले त्यालाही  झाले, आता तुम्हाला बाळ कधी होणार ?’ असे सतत विचारत असतात. कंटाळा आला हो या विचारण्याचा, नकोसे झाले आहे आता.

तन्वीला ‘PCOD’ नावाचा रोग असल्याची व श्रीला शुक्राणूंची कमतरता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तेव्हापासून अनेक ठिकाणी ट्रीटमेंट करून काहीही उपयोग होत नव्हता. आणि शेवटी आयुर्वेदाने काही होईल का म्हणून ते दोघे माझ्याकडे आले होते. प्रथम त्यांना थोडा धीर दिला, थोडा विश्वास दिला व नंतर समजावण्यास सुरुवात केली. वंध्यत्व ही गोष्ट खूप गुंतागुंतीची आहे.आपल्याला मूल होणार कि नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. काही गोष्टी देवाने किंवा निसर्गाने म्हणा त्याच्या हाती राखून ठेवल्या आहेत. आता आपल्या हातातील गोष्टी कोणत्या यावर विचार करणे जास्त चांगले, होय की नाही? आपण यावर काय करू शकतो याचा विचार जास्ती महत्वाचा. जे प्रश्न आपण सोडवू शकतो, ज्याची उत्तरे मिळू शकतात ,अशात आपण बसतो का ? हे पाहावे. PCOD व शुक्राणूंची कमी हे काही आयुर्वेदाला सोडवण्यासाठी मोठे प्रोब्लेम नाहीत पण ते प्रोब्लेम सोडवूनही कधीकधी मुल होत नाही अशीही उदाहरणे आहेत ( मी सगळ्यांसाठीच्या प्रश्नाकरिता बोलत होतो.)

मूल होणे हे काही फक्त दोन शरीरे एकत्र येण्याने, स्त्री – पुरुष बीज यांच्या मिलनानेच होत असते तर IVF सारख्या  आधुनिक ट्रीटमेंट्सचा उपाय १०० टक्के गुणकारी ठरला असता. पण तसे होताना दिसत नाही. कारण दोन बीजे एकत्र आली तरी त्यात जीव चैतन्य यावे लागते, त्याचे पुढे पोषण व्यवस्थित व्हावे लागते, त्यासाठी  आवश्यक वातावरण निर्मिती व्हावी लागते. जसे शेतकरी शेतात बी लावतो त्याचे रोप उगवण्यासाठी ती जमीन प्रथम नांगरावी लागते, मशागत करून तयार ठेवावी लागते, खतपाणी घालून तयार करावी लागते,योग्य काळ (पावसाळा इ.) आला की मग उत्तम जातीचे बियाणे त्या जमिनीत रुजवावे लागते आणि नंतर त्यास वेळोवेळी पाणी, खत इ द्यावे लागते. त्याच प्रमाणे आयुर्वेदाने ऋतू ( काळ ), क्षेत्र ( जमीन, गर्भाशय इ ), अंबू (पाणी-पोषण इ), बीज (बी-बियाणे , स्त्री-पुरुष बीजे ) या चार गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या आहेत.

क्रमशः

                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables and fruits etc available

please see the articles on www.amrutaayurved.in /articles

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center

Contact – 9869105594

For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594

For more informative Ayurveda articles –

www.amrutaayurved.in

http://amrutaayurvedthane.blogspot.in

https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter